वाढती उष्णता आणि पित्तामुळे तोंड येत असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

आता सध्या उन्हाळा सुरू आहे आणि या दिवसात वातावरणातील गरमीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. उन्हाळ्यात सगळ्यांनाच खूप घाम येतो. त्याबरोबरच शरीरातील उष्णता वाढून वेगवेगळया समस्या उद्भवायला सुरूवात होते.
जशी जशी उष्णतेचे प्रमाण वाढते तसतसे हाता-पायांची आगआग होणं, ओठ फाटणं, लघवी करताना जळजळणं, स्किन इन्फे-क्शन ,घामोळ्या तसंच खाज खुजली होण्याच्या समस्या उद्भवतात. तोंडाच्या अल्सरची समस्या १ -२ वेळा सगळयांनाच उद्भवते.
काहीजणांना ३ ते ४ दिवस तर काहींना १५ दिवस या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे खायला प्यायला त्रास होऊन शरीरातील अशक्तपणा वाढत जातो. शरीरातील पित्त वाढल्यामुळे अशी समस्या उद्भवते. आज आम्ही तुम्हाला तोंडाचा अल्सर दूर करण्याचे काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांमुळे तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.
तुम्ही धू-म्रपा-न आणि मद्यपान करत असाल तर तुम्हाला तुम्हाला देखील अल्सर होण्याची शक्यता अधिक आहे. धू-म्रपा-न म्हणजे तंबा-खू आणि त्यातही तुम्ही तो जाळून शरीरात घेता त्यामुळे तुम्हाला धू-म्रपा-न आणि म-द्यपा-न केल्यानंतर तुम्हाला अल्सरचा त्रास होऊ शकतो.
हळद – हळद गुणधर्मच अँटीसेप्टीक आहे. अल्सरला आपण एकप्रकारची जखमच म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही दुधात हळद घालून पिऊ शकता. तुम्हाला हळदीचे सेवन अशापद्धतीने करता येईल. परिणामी रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा वाढते आणि तोंडातील अल्सरपासून आराम मिळतो.
तुलशीच्या पाण्याच्या गुळण्या करा – तुळस ही तोंडाच्या अल्सर पासून सुटका मिळवण्याासाठी एकदम फायदेशीर ठरते. कारण तुळशीच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरिअल, अँटीव्हायरल गुण असतात.
तुळशीच्या पाण्याच्या सेवनाने व्हायरस आणि बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. त्यासाठी २ ग्लास पाण्यात १० ते १२ तुलशीची पानं घाला आणि उकळून घ्या. त्यानंतर थंड करा. या पाण्यात २ चमचे मीठ घालून गुळण्या करा. सलग दोन दिवस हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.
मध – मधात औषधी गुणधर्म असल्याने डिहायड्रेशनच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. मधामुळे अल्सर कमी होण्यास मदत होते. मधातील अॅन्टी-मायक्रोबियल घटकांमुळे तोंडातील अल्सर लवकर बरा होण्यास मदत होते.
नारळ – सुकं खोबरं, खोबर्याचं तेल तसेच नारळाचं पाणी हे तीनही घटक तोंडातील अल्सरपासून आराम मिळवण्यास मदत करतात. त्यासाठी सुकं खोबरं चखळून खा. सतत दोन दिवस हा प्रयोग केल्यास समस्या कमी होईल. याशिवाय नारळाचं पाणी शरीरातील उष्णता कमी करून शरीर थंड ठेवतं. म्हणून तुम्ही नारळपाणी पिऊन अल्सरची समस्या दूर करू शकता