‘रामायण’च्या लक्ष्मणने ‘स्मिता पाटील’सोबत चित्रपटात केला आहे रोमान्स.

‘रामायण’ या पौराणिक मालिकेचे पुन्हा एकदा दूरदर्शनवर प्रसारण सुरू आहे. त्यामुळे या मालिकेत कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. प्रत्येकजण त्यांचा चाहता झाला आहे. पण री-टेलिकास्टनंतर ज्या कलाकाराची सर्वाधिक प्रशंसा होती आहे ती म्हणजे सुनील लाहिरी, ज्यांनी ‘रामायण’मध्ये लक्ष्मणची भूमिका केली आहे.
सुनील लाहिरीचे तारुण्याचे काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहिल्यानंतर चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत. काही मुली असे देखील म्हणाल्या आहेत की, यांची आणि माझी पूर्वी भेट का झाली नाही. जर झाली असती तर मी यांच्याशी लग्न केले असते.
ज्या दिवसापासून रामानंद सागरचे रामायण दूरदर्शनवर सुरू झाले आहे, त्या दिवसापासून सुनील लाहिरीने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले आहे. ‘लक्ष्मण’ व्यक्तिरेखेवर जितके मिम्स बनविलेले आहेत, तितकेच अन्य कोणत्याही कलाकारावर बनवलेले नाही. ‘रामायण’मधील त्यांचा अभिनय आणि ऊर्जेचे कौतुक होत आहे.
‘विक्रम आणि बेताल’मध्येही केले आहे काम
रामानंद सागर सोबत सुनील लाहिरीने बरेच काम केले आहेत. ‘विक्रम और बेताल’ मध्ये त्यांनी बर्याच भूमिका साकारल्या होत्या.
‘परमवीर चक्र’ मध्ये ‘लक्ष्मण’ने सर्वांना चकित केले.
1990 च्या ‘परमवीर चक्र’ या मालिकेमधील सुनील लहरी यांनी साकारलेली दुसरे लेफ्टनंट राम रघुबा राणे ही भूमिका लोकांना चांगलीच पसंत पडली होती.
‘रामायण’पूर्वीच केला होता चित्रपटात प्रवेश
सुनील लाहिरी यांनी केवळ टीव्हीमध्येच नव्हे तर चित्रपटांमध्येही बरीच कामे केली. ‘रामायण’ मध्ये त्यांची कास्टिंग नंतर झाले. आधी 1980 मध्येच त्यांनी चित्रपटात प्रवेश केला होता.
‘लक्ष्मण’ या चित्रपटात स्मिता पाटील सोबत दिसला होता.
1980 मध्ये सुनील लाहिरीचा पहिला चित्रपट ‘द नेक्सलीइट्स’ होता, ज्यामध्ये स्मिता पाटील ही नायिका होती. यानंतर त्यांनी ‘फिर आई बरसात’ आणि ‘बहार की मंजिल’ हे आणखी चित्रपट त्यांनी केले.
म्हणूनच लक्ष्मणने चित्रपट सोडले
सुनील लाहिरी ‘रामायण’मध्ये लक्ष्मणच्या भूमिकेत इतके लोकप्रिय झाले की पुन्हा त्या स्तराची भूमिका त्यांना मिळाली नाही. त्यामुळे चित्रपटांमध्ये काही खास आनंद त्यांना वाटला नाही आणि नंतर चित्रपट काम न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुनील लाहिरी यांनी दक्षिण चित्रपटांमध्ये आपला हात आजमावला आहे.
2012 मध्ये सुनील लहरी यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर त्यांनी भोपाळच्या जेके मेडिकल कॉलेजला वडिलांचा मृतदेह दान केला. सुनील त्या वेळी म्हणाले की, वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीरशास्त्र अभ्यासासाठी होणाऱ्या अडचणींबद्दल वडिलांना माहिती होते.
म्हणूनच त्यांनी आपल्या इच्छेनुसार असे लिहिले की, त्यांच्या मृत्यूनंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांना द्यावे जेणेकरून त्यांना त्यांच्या अभ्यासात मदत करता होईल.