जमिनीवर बसून जेवण केल्याने शरीरास होतात ‘हे’ 10 आरोग्यवर्धक फायदे

जमिनीवर बसून जेवण केल्याने शरीरास होतात ‘हे’ 10 आरोग्यवर्धक फायदे

आजच्या काळात असे फार कमी लोकं आहे ज्यांना खाली जमिनीवर बसणं आवडतं. बरेच लोकं खुर्ची वर बसून आपले काम करण्यास प्राधान्य देतात आणि जेवण सुद्धा खुर्ची टेबलावर बसूनच करतात. पण आपणांस ठाऊक आहे का की खुर्ची वर बसल्याने आपण आपल्या बऱ्याचशा स्नायूंचा वापर करत नाही अश्या परिस्थितीत आपल्याला जमिनीवर बसल्यावर उठायला त्रास होतो.

जर आपण देखील त्यापैकी एक आहात, ज्यांना जमिनीवर बसण्यापेक्षा खुर्चीवर बसणं जास्त आवडत, तर एकदा जमिनीवर बसण्याचे फायदे जाणून घ्या, नक्कीच आपण फायदे जाणून घेतल्यावर खुर्ची वर बसणं नेहमीसाठी विसराल.

1) पचन सुधारते : जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते  या सतत होणार्‍या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.

2) वजन घटवण्यास मदत होते : जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. जमिनीवर बसून जेवताना, मेंदू शांत होतो व जेवणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित होते.  वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे.  जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते.  टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.

3) लवचिकता वाढवते : पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.

4) मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते : जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. प्रख्यात आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांच्यामते, जेवताना त्याचा स्वाद, चव, स्वरूप यावर लक्ष दिल्याने तसेच तुम्ही किती प्रमाणात त्याचे सेवन करत आहात याबाबत सजग राहिल्यास तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता.

5) कुटुंबातील सदस्यांशी जवळीक  वाढते : दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा. कारण जमिनीवर बसून जेवल्याने मन शांत व प्रसन्न होते. दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास  मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी  जवळीक वाढते.

6) शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते : शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. उत्तम शारीरिक स्थितीमुळे काही अपघात टळू शकतात तर शरीरातील काही स्नायू व  सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.

7) दीर्घायुषी बनवते : ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे.  कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक असते.

8) गुडघे व  कमरेतील सांधे मजबूत होतात : या  पुस्तकाचे लेखक पी.एस. वेंकटेशवरा यांच्यामते, पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.  पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व  कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.

9) चंचलता कमी होते  : मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील  त्रास कमी होतात.

10) हृदयाला होणारा रक्तपुरवठा  सुधारतो : काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का ?  हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला  उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *