सुशांत गेल्यानंतरही अंकिता लोखंडे सांभाळत आहे सुशांतची ‘ही’ निशाणी..वाचून थक्क व्हाल !

सुशांत गेल्यानंतरही अंकिता लोखंडे सांभाळत आहे सुशांतची ‘ही’ निशाणी..वाचून थक्क व्हाल !

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अभिनेत्यांनी आपला जी*व गमावला आहे. काही महिन्यापूर्वी जवळपास अकरा अभिनेते हे जग सोडून गेले आहेत. यामध्ये गेल्या महिन्यातच ऋषी कपूर, इरफान खान यासारख्या अभिनेत्यांना आपण गमावले आहे. त्यानंतर सर्वात मोठा धक्का हा सुशांत सिंह राजपूत गेल्यानंतर सर्वांना बसला होता.

अतिशय उमेदीच्या काळात त्याने हे जग सोडून जाणे कोणालाही पटलेले नाही. 34 वर्ष हे वय काही जाण्याचे नव्हते. त्यामुळे अनेकांना आजही गहिवरून येत आहे. सुशांतचे फॅन फॉलॉवर एवढे मोठ्या प्रमाणात होते की त्यांना खूप मोठे दुःख झाले आहे. तसेच काही अभिनेता, अभिनेत्री देखील आता व्यक्त होत आहेत.

कंगना नंतर रविना टंडन हिने देखील या बाबत पोस्ट केली आहे. मात्र, सुशांत सिंह राजपूत याच्या जवळचा मित्र असलेल्या संदीप सिंह याने नु कतीच इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली आहे. तसेच त्याने अंकिता लोखंडे, सुशांत सिंह राजपूतसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. संदीप हा अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांचा दोघांचा कॉमन फ्रेंड आहे.

संदीप सिंह राजपूत म्हणाला की, लोखंडवाला परिसरामध्ये आम्ही तिघेही एका कुटुंबासारखी राहत होतो. तिघांनी अनेक आठवणी शेअर केलेल्या आहेत. तसेच आपण तिघेही एकत्र जेवण बनवत. तसेच घरातील साफसफाई देखील करायचो. किती चांगले दिवस होते ते. अंकिताबाबत लिहिताना तो म्हणाला की, अंकिता त्याची बेस्ट गर्लफ्रेंड होती. मला असे वाटत होते की, अंकिता आणि सुशांत यांनी लग्न करावे.

माझी ही इच्छा अपुरी राहिली. अंकिता आणि सुशांत यांचे प्रेम अतिशय पवित्र होते. त्यामुळे ते कधीही न तुटणारे आहे. अंकिता आजही सुशांत बाबत हळवी असल्याचे यामुळे दिसते. या दोघांचे नाते जरी तुटले असले तरी अंकिता त्याचा नेहमीच आदर करत असे. सुशांत गेल्यानंतर अंकिता आवर्जून त्याच्या कुटुंबियांना भेटायला देखील गेली होती.

मला असे नेहमी वाटायचे की, या दोघांनी कधीही दूर जाऊ नये. जर अंकिता आणि सुशांत यांचे लग्न झाले असते तर अंकिता हिने सुशांतला आत्महत्या करण्यापासून नक्कीच प्रवृत्त केले असते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. संदीप सिंह याने तिघांचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यामुळे याची चांगलीच आता चर्चा होत आहे. अंकिता सुशांत बरेच वर्षे एकत्र राहिले होते.

पवित्र रिश्ता या मालिकेतून या दोघांनी पदार्पण केले होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. यामुळे दोघांचेही मन खूप दुखावले गेले होते. याबाबत सुशांतने सांगितले होते.अंकिताने देखील वारंवार आपल्याला सुशांतचा खूप आदर असल्याचे सांगितले होते. अंकिता ही आजही सुशांत याची आठवण जपत आहे.

अंकिता ज्या घरात राहते त्या घराच्याबाहेर आजही सुशांत याच्या नावाची पाटी लागलेली आहे. त्यामुळे तिच्या मनात सुशांतविषयी किती आदर आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे अंकिता त्याला अजूनही विसरलेली नाही, हेच यातून दिसते, असेही सिंह म्हणाला.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *