फेसबुकवरील मैत्रिणीशी अश्लील चॅटिंग करायचा हा पोलीस, प्रत्यक्षात भेटला तर निघाली बायको, पुढे झालं ते वाचून पाया खालची जमीन सरकेल

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे यावर अनोळखी लोकांची आपली मैत्री जुळून आपण नकळत त्यांच्याशी बोलत असतो त्याचबरोबर असे अनेक उदाहरण देखील आपण पाहिले असतील की सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर लग्न केले.
दरम्यान, अशा अनेक घटना देखील घडल्या आहेत की ऑनलाईन ओळख झाल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर यात अनेक प्रकारच्या फसवणूक देखील झालेल्या आहेत कारण सध्याच्या काळात मोबाईल हा रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे.
त्यामुळे बाहेरचा कुठलाही विचार न करता ती व्यक्ती सतत ऑनलाईन असल्यामुळे ऑनलाईन त्या व्यक्तीशी तिची जवळीक वाढू लागते आणि अशा प्रकारच्या घटना घडू लागतात. कारण आपण ज्या व्यक्तीशी सोशल मीडियावर चाट करत असतो ते आपल्याला माहित नसते कि बोलणारी व्यक्ती ही आपल्याशी सगळं खरं सांगत आहे का?.
कित्येक प्रकरणात सोशल मीडियावर चॅटिंग करणारे व्यक्ती सांगितल्याप्रमाणे नसून अगदी वेगळी असते. पण नुकताच या बाबतीतील एक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांच्या गुप्तचर शाखेचा पोलीस शिपाई त्याच्याच पत्नीच्या सापळ्यात अडकला. फेसबुकवर एका महिला समजून मैत्री केली आणि अ’श्लील गोष्टी बोलण्यास सुरूवात केली.
नंतर त्याने त्या मैत्रिणीला सबंध ठेवण्यासाठी भेटायला बोलावले तर ती त्याचीच बायको निघाली. वास्तविक, त्या पोलीस शिपाईची पत्नी त्याच्यावर संशय घेत होती आणि तीने शिपायाला नियोजन करून बरोबर पकडले. त्यानंतर त्याच्या पत्नीने डीआयजीकडे रीतसर तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीत ती म्हणाली की अशा पतीबरोबर मी राहू इच्छित नाही. त्याचेवर थेट गुन्हा दाखल करावा.
सुखलिया (सीजेआरएम) निवासी मनीषाच्या मते, आरोपी सत्यम बहल याच्याशी गेल्या वर्षी 22 फेब्रुवारी रोजी तिचे लग्न झाले होते. सत्यम स्पेशल ब्रांच (एसबी) मध्ये तैनात आहे. लग्नानंतर तीन महिन्यांनंतर सत्यम आणि मनीषाचा कलह सुरू झाला. पैसे, कारची मागणी करुन सत्यमने तीला त्रास देणे सुरू केले.
त्याने पोलिस असल्याची धमकी देऊन मनीषालाही मारहाण करण्यास सुरवात केली. अस्वस्थ होऊन मनीषा तिच्या माहेरच्या घरी आली. बरेच दिवस झाले तरी नवऱ्याचा फोन नाही आणि नवऱ्यासोबत बोलण न झालेने तिला संशय आला. मनीषाला संशयास्पद वाटलेनंतर तीने सत्यमबद्दल अधिक माहिती गोळा करण्यास सुरवात केली.
तीने रुही मेहेरच्या नावाने फेसबुकवर बनावट फेक आयडी तयार केला आणि सत्यमशी गप्पा मारण्यास सुरवात केली. सत्यमने त्याचे प्रेम तिच्यासमोर मेसेज द्वारे व्यक्त केले, मग त्यानंतर आगळीक करून शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा प्रकट केली. मनीषा त्याला टाळत राहिली आणि ती दुटप्पी अर्थही बोलत राहिली.
जेव्हा सत्यमने भेटायला दबाव आणून जास्तच जबरदस्ती केली तेव्हा तिने त्याला खरी वस्तुस्थिती सांगितली. यानंतर 6 ऑगस्ट रोजी डीआयजी हरिनारायणचारी मिश्रा यांच्याकडे स्क्रीन शॉट्ससह रीतसर नवऱ्याविरुध तक्रार दाखल केली होती. डीआयजीने पोलिस स्टेशनला त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
बायकोचा आरोप- नवऱ्याने तीला दासी बनून ठेवले ठेवत होते : मनीषाच्या म्हणण्यानुसार वडिलांनी लग्नात घरातील सर्व वस्तू, रुपये, दागिने आणि भेटवस्तू दिली होती. थोड्याच वेळात सत्यम आणि त्याची बहीण नेहा, सासू आरती यांनी दुचाकी आणि पैशांची मागणी करण्यास सुरवात केली. मनीषाचा फोन हिसकावून घेतला आणि तिच्यावर वर्तमानपत्र वाचण्यास, दूरदर्शन पाहण्यास बंदी घातली. सहाय्यकांसारखे नियम बनविले.
कुटुंबातील सर्व सदस्य झोपल्यानंतरच तीला झोपायला सांगितले होते. नवऱ्याचे शूज आणि बाथरूम स्वच्छ करण्यास सांगत असे. तो म्हणत होता की तू माझी दासी आहेस, माझ्यासमोर नेहमीच झुकत जायचं. विरोध केल्यावर म्हणत असे की मी पोलिस आहे.
मी तुझ्यावर खोट्या केसेस करून तुला अडचणीत टाकीन. अस्वस्थ होऊन मनीषा तिच्या माहेरच्या घरी आली. थोड्या वेळाने मनिषाचे मावस बहिणीने सांगितले की सत्यम मला घराबाहेर मला भेटायला बोलवत होता. यामुळे तीची शंका अधिकच वाढली आणि त्याची हेरगिरी सुरू केली.
लग्न मोडण्याचा कट रचला : टिळक नगर येथे राहणार्या तरूणाने आपल्या मंगेत्राविरोधात फिर्याद दिली आहे. एका खासगी कंपनीत नोकरी करणार्या या युवकाचा आरोप आहे की, त्याने जून 2019 मध्ये होशंगाबाद येथे राहणार्या एका महिलेशी लग्न केले होते. मुलीला लग्न करायचं नव्हतं. घरातील सदस्यांना नकार दिल्यावर तीने नेहाच्या नावाने बनावट आयडी बनविला आणि अश्लील गोष्टी बोलू लागला.
नंतर नातेवाईकांना स्क्रीन शॉट्स दाखवून होणारे लग्न बंध पाडले. त्या तरुनाला काहीतरी संशयास्पद वाटायला लागले आणि त्याने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, मुलीला लग्न मोडायाचे होते.