पीठ मळताना नक्की वापरा ही ट्रीक, पोळी फुलल्याशिवाय राहणार नाही….

भारतीय लोकांचे जेवण हे पोळी किंवा फुलक्यांशिवाय पूर्ण होत नाही. प्रत्येकाला फुललेली आणि गरम पोळी खायला आणि बनवायला आवडते. जेव्हा पोळी गोल येते आणि छान फुलते तेव्हा बनवणाऱ्याला आणि खाणाऱ्यालाही आनंद होतो. परंतु अनेक लोक पोळीसाठी पीठ मळताना अशी एक चूक करतात, ज्यामुळे आपली पोळी फुलत नाही आणि काही वेळात पापडासारखी कडक होते. आज आपण नरम आणि फुलणारी चपाती कशी बनवायची ते जाणून घेऊया…
– पोळी, पुरी किंवा पराठा बनवण्यासाठी तुम्हाला पीठ मळणे सगळ्यात महत्वाचे आहे. बऱ्याच लोकांना हे काम कंटाळवाणे वाटते, परंतु स्वयंपाक घरातील हे सर्वात महत्वाचे काम आहे.
– पीठ मळायला जास्त वेळ जाऊ शकतो, परंतु पटापट पीठ मळल्याने आपल्या पोळीची चव खराब होऊ शकते, म्हणून ५ ते १० मिनिटे पीठ मळा.
– जरी आपण अनेक गोष्टी मोजून मापून करतो, तरी पीठ मळताना आपण मोजून पाणी घेत नाही, तर अंदाजे घेतो. बऱ्याचवेळा असे केल्याने पीठ एकतर कडक होते किंवा खूप मऊ होते. त्यामुळे परफेक्ट पीठ मळण्यासाठी मोजून पाणी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, २ कप पीठासाठी २ कप पाणी घ्या.
– नरम पोळी करण्यासाठी कधीपण एकत्र पाणी टाकून पीठ मळू नका. नेहमी पीठात थोडं थोडं पाणी टाका.
– पीठ मळताना त्यात मीठ घालणार असाल तर, पाणी कमी प्रमाणात वापरा. कारण मीठ देखील पाणी सोडते. यामुळे पीठाला कणिक ओलं होण्याची शक्यता असते.
– एकदा कणिक मळून झालं की कणिकाच्या गोळ्याला पसरवा आणि त्यावर थोड पाणी शिंपडून ५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर पुन्हा एकदा कणिकाला चांगले मळा.
– त्यानंतर छोटा चमचा तेल किंवा तूप घ्या आणि पुन्हा एकदा पीठ मळा, या वेळी पीठ मऊ आणि गुळगुळीत होईल.
– त्यानंतर पोळी करा ही पोळी नक्कीच मऊ असेल.