‘ज्या’ अभिनेत्रीमुळे अविवाहित राहिला ‘अक्षय खन्ना’ त्याच अभिनेत्रीच्या खऱ्या संसाराचे वाजले तीन-तेरा..आज बिन नवऱ्याची…

अक्षय खन्नाने १९९७ साली हिमालयपुत्र या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांचा हा दुसरा मुलगा आहे. याने अभिनय केलेल्या चित्रपटांपैकी आ अब लौट चले, ताल, दिल चाहता है, हमराज, गांधी, माय फादर हे काही मुख्य चित्रपट होते ज्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर चांगलीच धमाल केली होती.
1997 मध्ये जेपी दत्ता यांचा ‘बॉर्डर’ सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातील अक्षयच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सिनेमासाठी अक्षयला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला होता. शिवाय सहायक अभिनेता म्हणून नामांकन देखील मिळाले होते. पण आज आपण अक्षयच्या वय’क्तिक जी’वनाबद्दल आणि त्याच्या प्रे’म जी’वनाबद्दल बोलणार आहोत.
तसे तर अक्षयचे फिल्मी करियर एवढे काही खास राहिले नाही पण तो त्याच्या प्रेम जीवनामुळे बराच काळ चर्चेत होता. कदाचित आपल्याला याबद्दल काहीच माहित नसेल आणि आजकाल अक्षय आपल्याला कोणत्या चित्रपटामध्ये सुद्धा दिसत नाही चला तर मग जाणून घेऊ.
अक्षय खन्ना ४७ वर्षांचा असूनही अद्याप तो अविवाहित आहे. आणि आज त्याचा आज २८ मार्च त्याचा वाढदिवस आहे म्हणून आज आम्ही आपल्याला अक्षय खन्नाच्या आयुष्याबद्दल एक रंजक गोष्ट सांगणार आहोत ज्यामुळे आपल्याला खरोखरच आश्चर्य वाटेल.
त्याने आपल्या चित्रपट कारकीर्दीत आजपर्यंतच्या अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण ते चित्रपट मोजकेच असले तरी त्यापैकी जास्त हिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले आहे. त्यातील त्याचा पहिला चित्रपट बॉर्डर होता आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे अक्षयच्या अभिनयाचे कौतुक झाले त्यासाठी बेस्ट ऍक्टर अवार्ड देखील मिळाला होता.
अक्षय खन्ना ४७ वर्षांचा असला तरी आजही तो बॅचलर आहे. पण या अभिनेत्रीमुळे अक्षय खन्ना अजूनही अविवाहित आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती अभिनेत्री दुसरी कुणी नसून करिश्मा कपूर आहे. करिश्मा कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीची एक सुंदर अभिनेत्री आहे.
अक्षय खन्नाला करिश्मा कपूर खूप आवडायची आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं होत. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय खन्नाने करिश्मा कपूरच्या घरी लग्नाचा प्रस्तावही पाठविला होता. करिश्मा वडील रणधीर कपूर यांनाही अक्षय पसंत होता. आपल्या लेकीचं लग्न अक्षय खन्नाशी व्हावं, अशी त्यांची इच्छा होती.
अक्षयचे वडील विनोद खन्ना यांनाही हा प्रस्ताव मान्य होता. पण एक व्यक्ति या लग्नाआड आली आणि हे लग्न होता होता राहिलं. ती व्यक्ती कोण तर करिश्माची आई बबीता. होय, करिश्माची आई बबीता यांनी या लग्नाला जोरदार वि’रो’ध केला. त्याकाळात करिश्मा यशाच्या शिखरावर होती. करिश्माने याकाळात लग्न करू नये, अशी बबीतांची इच्छा होती.
त्यांच्या इच्छेखातर करिश्माच्या लग्नाचा विषय मागे पडला आणि अक्षय व करिश्माच्या लग्नाची बोलणीही थांबली. पुढे करिश्माने संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली पण अक्षय मात्र अद्यापही अविवाहितच आहे. अक्षय कधीच यावर बोलला नाही. लग्नाचा विषय आला की, त्यानं तो टाळला. पुढे पुढे तर मला जबाबदारी नको होती, म्हणून मी लग्न केलं नाही, असं तो सांगू लागला.
सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये अक्षय लग्नाबद्दल बोलला होता. ‘ मी कमिटमेंटसाठी कधीही तयार नव्हतो. लग्नानंतर सगळंच बदलतं. मुलं झाल्यानंतर तर तुमचं आयुष्य मुलांभोवती केंद्रीत होतं. ही जबाबदारी पेलायची माझी कधीच तयारी नव्हती. म्हणून मी लग्नाचा विचारच केला नाही, असं तो म्हणाला होता. आणि पुढे करिष्माचाही घट’स्फो’ट झाला.
आणि तिचा घ’टस्फो’ट खूप वा’दग्र’स्त राहिला कारण तिच्या पतीवर तिने अनेक आरो’प लाव’ले होते तसेच पतीने देखील करिश्मावर माझ्यासोबत पै’शासाठी लग्न केळ्याचा आ’ रोप त्याने लावला होता.