आपल्याकडून फाटलेल्या जुन्या पुराण्या नोटांचे नेमकं काय करते RBI ? पूर्ण प्रोसेस पाहून चक्रावून जाल…

सबसे बडा रुपैय्या’ हे आपण रोजच ऐकतो. आपण सर्वचजण ती गोष्ट, स्वीकारतो देखील. आजच्या काळात, पै’सा खूप जास्त महत्वाचा आहे. जे आहे ते पै’से कमवण्याचीच शर्यत आहे. यामध्ये कोणी पुढे जातात तर कोणी माघेच राहतात. आपण नेहमीच, हे पै’से जपून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.
म्हणजे, जेव्हा आपल्याला खूप गरज असेल, आपण ते पै’से वापरू शकतो. मात्र ज्यावेळी नोटबंदी घो’षित झाली त्यावेळी, संपूर्ण देश चिं’ताग्रस्त झाला होता. संपूर्ण देश आपल्या जवळच्या नोटा बदलून घेण्यासाठी लाईनमद्धे उभा होता. त्यावेळी त्या नोटा किती आवश्यक आहेत हे आपल्या सर्वानाच समजले होते.
त्यावेळी तर आपण सर्वानीच नोटा बदलून घेतल्या होत्या. मात्र, इतरवेळी देखील आपल्याला नोटा बदलून घ्याव्या लागतात. जर त्या नोटा जुन्या किंवा फाटक्या असल्या तर आपल्याला नोटा बदलून घ्याव्या लागतात. अनेकवेळा आपण बाहेर खरेदी करायला गेलो की, आपल्याकडे गडबडीत फाटक्या आणि जुन्या नोटा जमा होतात.
या जुन्या नोटा, आपल्याकडून इतर कोणी घेण्यास टाळते. अशा वेळी नक्की त्या नोटांच काय करावा असा प्रश्न आपल्याला पडतो. मग आपण देखील, त्या नोटा कोणाकडे तरी खपवण्याचा प्रयत्न करतो. मात्र प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही, म्हणून आपण बँकेत ते पैसे जमा करतो आणि त्याबदल्यात दुसऱ्या नोटा घेतो.
अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो, की आरबीआय देखील या फाटक्या नोटांचे नक्की काय करतात? या जुन्या आणि फाटक्या नोटांना बदलण्याची आणि विल्हेवाट लावण्याची एक मोठी प्रक्रिया आहे. जाणून घेऊ या त्याच पद्धतीबद्दल. सगळ्यात पहिले या नोटा एकत्रित केल्या जातात. त्या एकत्रित केलेल्या नोटांना सर्वात पहिले जाळून टाकण्यात येत होते.
मात्र, या नोटा भरपूर प्रमाणात जमा होत असे. आणि त्यामुळे त्यांना, जाळण्याने पर्यावरणाचे खूप नुकसान होत होते. त्यामुळे आता आरबीआय वेगळ्या पद्धतीने, या नोटांना नष्ट करतात. जमा झालेल्या नोटांचे खूप जास्त छोटे तुकडे केले जातात. नोटांच्या छोटया तुकड्याना रिसायकल केले जाते. होय, आपण वापरत असलेल्या नोटा, रिसायकल पेपर पासून बनवलेल्या असतात.
त्यांना रिसायकल करुन, त्यांच्यापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात. या नोटांपासून बनवलेल्या वस्तू, मार्केटमध्ये विकण्यात येतात. नोटा किती छापायच्या याचे स्वातंत्र्य आपल्या देशाकडे आहे. मात्र सरकारकडून, रिझर्व्ह बँकेला त्याबद्दलची अनुमती सरकारकडून घ्यावी लागते. रिझर्व्ह बँकेला एक रुपयापासून दहा हजारांची न छापण्याचे स्वातंत्र्य आहे.
मात्र, आपल्या देशामध्ये दोन हजारांचीच सर्वात मोठी नोट आहे. मधल्या काळात भारत सरकारने पाच हजारांच्या काही नोटा छापल्या होत्या. मात्र त्यामुळे, सर्वसामान्यांना असुविधा होत होती. म्हणून त्या नोटा बंद करण्यात आल्या.